Tuesday, January 13, 2009

मकर संक्रांत

सरत्या वर्षाला निरोप दिल्या नंतर नवीन वर्षी येणारा पहिला उत्सव हा मकर संक्रांत.ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.सुर्याने मकर राशीत प्रवेश केल्या नंतर दक्षिणायन संपून उत्तरायण सूर्य होते.उत्तरायण वर्षातिल शुभ काळ समजल्या जातो.महाभारतात भीष्म जेव्हा जखमी अवस्थेत होते तेव्हा ते मृत्यु साठी ते मकर संक्रांतीची वाट पाहत होते,कारन उत्तरायण मृत्यु मोक्ष प्राप्ति देतो असा समज आहे.उदया १४ जानेवारीला दुपारी १२ वाजून ५ मिनिटानी सुर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होइल.प्रवेश समयाच्या ६ तास आधी ६ तास नंतर पुण्य काळ असतो.हा समय अतिशय शुभ मानल्या जातो.ह्या वेळी केलेले दान धर्म पुण्य देउन जातात.ह्या वर्षी मकर संक्रांत आणि संकष्टी चतुर्थी एकाच दिवशी येत आहेत.तीळ हे हविशान्न असल्यामुळे उपवासाच्या दिवशी पण ह्याचे सेवन करता येइल.

उत्तर भारतात पण हा दिवस खुप उत्साहात साजरा केला जातो.दक्षिणायनचा शेवटचा दिवस इथे होली पेटवून लोड़ी ह्या नावाने साजरा करतात.लोढ़ी हा तिलोधी ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे .अग्नि देवाचे प्रतिक असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी होली पेटवाली जाते.नवीन आलेल्या पिकाचे स्वागत पण ह्याद्वारे उत्साहात केल्या जाते।

No comments: